अवकाश संशोधनात योगदान देणाऱ्या महत्वाच्या
व्यक्ती
व्यक्ती कालखंड योगदान

होमी
भाभा
ऑक्टोबर ३०, इ.स. १९०९ – जानेवारी २४, इ.स.
१९६६होमी भाभाने सन १९४५ मध्ये
टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यास हातभार लावला.सन १९५० पर्यंत,ते आण्विय उर्जा खात्याचे सचिव म्हणून नियुक्त केल्या गेले. भारतीय
अवकाशसंशोधनाचा कार्यभारही त्यांचेकडेच होता.त्यांनी भारतीय आण्विक उर्जा आयोगाचे
अध्यक्षपदही भूषविले.त्यांचे दि.२४ जानेवारी १९६६ला एका विमान अपघातात झालेल्या
निधनापर्यंत,ते ते आण्विय उर्जा खात्याचे सचिव होते

विक्रम
साराभाई
१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ – ३१ डिसेंबर, इ.स.
१९७१ साराभाई यांनी अहमदाबाद मध्ये एक
भौतिक संशोधन प्रयोगशाळेची; विक्रम साराभाई अवकाश केंद्र
तिरुवनंतपुरम; अवकाश अनुप्रयुक्ति केंद्र अहमदाबाद आदींची
स्थापना केली.Faster Breeder Test Reactor (FBTR), Kalpakkam; Variable
Energy Cyclotron Project, Calcutta; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ
इंडिया लि. हैदराबाद; व युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
जादुगुडा बिहार ते सन १९६२ मध्ये Indian National Committee for Space
Researchचे अध्यक्ष होते. होमी भाभा यांच्या मृत्युनंतर, त्यांना भारताच्या अणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष तसेच अणू ऊर्जा खात्याचे
सचिव बनविण्यात आले. Sarabhai formally set up ISRO in its modern avatar
in 1969.
सतीश
धवन सप्टेंबर २५, इ.स. १९२० - जानेवारी ३, इ.स. २००२ धवन यांची नेमणूक सन १९७२ मध्ये इस्रोचे
अध्यक्ष म्हणून केली गेली. भारताच्या अंतराळ खात्याचे ते सचिवही होते. त्यांचा
मोठ्या कार्यकाळात, इस्रोच्या अनेक यशस्वी कामांना व जलदगती
विकासास हातभार लागला.

राकेश शर्मा जानेवारी १३, इ.स. १९४९ - एप्रिल ३,
इ.स. १९८४ला, राकेश शर्मांनी व Gennady
Strekalov तसेच Yury Malyshev यांचे समवेत,
रशियाच्या सोयुज टी-११ साल्युत ७ वर यशस्वीरित्या उतरले राकेश शर्मा
हे भारताचे अवकाशात जाणारे प्रथम नागरिक ठरले. त्यांना, या
मोहिमेसाठी, हिरो ऑफ सोव्हीयेट युनियन हा सोव्हीयेट सन्मान व
भारताचा अशोक चक्र हा सन्मान देण्यात आला.

राजा
रामण्णा जन्म:१९२५ - मृत्यु:२३
सप्टेंबर २००४ राजा रामण्णा यांनी भाभा
अणुसंशोधन केंद्र येथे (१९७२–७८ व १९८१–८३) या कालावधीत निदेशक म्हणून;निदेशक जनरल म्हणून DRDOयेथे; भारताच्या संरक्षण संशोधन येथे सचिव म्हणून
(१९७८-१९८१), सेवा दिलीअणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून
१९८४-८७ दरम्यान, राष्ट्रीय प्रगत शिक्षण संस्था, बंगलोर येथे निदेशकाच्या पदावर; जानेवारी ते
नोव्हेंबर १९९० दरम्यान भारताच्या मंत्रालयात संरक्षण राज्यमंत्री म्हणून; राज्य सभेचे सदस्य म्हणून ऑगस्ट १९९७ ते ऑगस्ट २००३ तसेच, भारताच्या प्रथम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून सेवा
दिली.

ए.पी.जे.
अब्दुल कलाम जन्म: १५
ऑक्टोबर इ.स. १९३१, मृत्यु: २७ जुलै, इ.स.
२०१५ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताच्या भारतीय आण्विक कार्यक्रमात,भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम आणि अनेक संरक्षण प्रकल्पात बरेच मोलाचे योगदान
केले.त्यांनी एसएलव्ही-३ या प्रकल्पाचे निदेशक म्हणूनही काम केले इस्रोत
यशस्वीरित्या काम केल्यावर,ते डीआरडीओ मध्ये संचालक म्हणून
गेलेत.डीआरडीओ मध्ये ते अनेक अग्निबाण विकासाचे मुख्य होते. त्यात नाग,
पृथ्वी, आकाश, त्रिशुल
आणि अग्नि अग्निबाण हे अंतर्भूत होते. त्यांची भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून
निवड केल्या गेली जेथे त्यांनी सन २००२ ते सन२००७ इतकी सेवा केली.

यु.
रामचंद्रराव जन्म: १० मार्च १९३२सन १९७२
नंतर राव यांनी भारतातील १५ उपग्रह प्रकल्पांच्या विकासावर देखरेख केली. त्यात
आर्यभट्ट, ॲपल, रोहिणी, इन्सॅट व भारताचा सुदूर संवेदन उपग्रह यांचा समावेश होता.भौतिक संशोधन
प्रयोगशाळेच्या शासन समितीचे ते अध्यक्ष म्हणून होते.अवकाश आयोगाचे अध्यक्ष व
अवकाश खात्याचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले. एएसएलव्ही पीएसएलव्ही व
जीएसएलव्ही या मालिकांतही त्याचे महत्त्वाचे योगदान होते. क्रायोजेनिक तंत्रज्ञान
व अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करण्यात व भारतात अवकाश तंत्रज्ञानाचा प्रयोगक्षम
वापर करण्यातही त्यांनी सहाय्य केले.

के.
कस्तुरीरंगन जन्म:२०
ऑक्टोबर १९४० कस्तुरीरंगन यांनी भारतीय
अवकाश कार्यक्रमात अनेक कळीची पदे भूषविलीत.ते २७ ऑगस्ट २००३ नंतर राज्यसभेचे
सदस्य होते.त्यांच्या महत्त्वाच्या योगदानात, पीएसएलव्ही
कार्यक्रम, जीएसएलव्ही मालिका व भारतीय सुदूर संवेदन उपग्रह
मालिकांचा समावेश आहे. त्यांचा कार्यकाळ भारतीय अवकाश कार्यक्रमाचे मुख्य म्हणून,
मार्च १९९४ ते ऑगस्ट २००३ इतका होता.

जी.
माधवन नायर जन्म:३१ ऑक्टोबर १९४३ इस्रोचे पदधारक अध्यक्ष, भारतीय अवकाश खात्याचे सचिव आणि बंगळुरूच्या अँट्रिक्स कॉर्पोरेशनचे
अध्यक्ष.

के.एन.
शंकर जन्म: ७ मे
१९४५ हे सन २००२-२००५ या काळात, इस्रोच्या अवकाश अनुप्रयुक्ति केंद अहमदाबाद व इस्रो उपग्रह केंद्राचे
संचालक होते. त्यांना २००४ साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

एम. अण्णादुराई जन्म:२ जुलै १९५८ अण्णादुराई यांनी चांद्रयान चंद्र मोहिमेचे संचालन केले.त्यांनी आपली
सेवा यापूर्वी आयआरएस १ए, आयआरएस १बी, इन्सॅट २ए,
इन्सॅट २बी व एज्युसॅट प्रकल्पात दिली.