राज्यातील कोणत्याही
भागात साथरोगाचे रुग्ण आढळल्यास त्याची ‘रिअल टाईम’
माहिती आरोग्य विभागाला मिळणार आहे. विविध आजारांच्या माहितीच्या आधारे साथरोगाच्या
उद्रेकाचा इशारा देणारी ही संगणकीय प्रणाली राज्यात पुढील महिनाभरात कार्यान्वित
होईल. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन व्यासपीठ
(आयएचआयपी) अंतर्गत ही प्रणाली सुरू केली जाणार असून महाराष्ट्र देशातील नववे
राज्य ठरले आहे. तसेच केंद्र सरकार व
जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे ‘आयएचआयपी’ हे व्यासपीठ विकसित केले आहे.
देशात नोव्हेंबर 2018 पासून टप्याटप्याने काही
राज्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातही ही प्रणाली सुरू करण्यासाठी काही दिवसांपासून तालुका,
जिल्हापातळीवर कर्मचारी, अधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू होते. संगणकीय प्रणाली तीन पातळ््यांवर काम करणार
आहे. पहिल्या टप्प्यात गाव पातळीवरील
प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची माहिती तेथील आरोग्य सेवकांकडून ‘एस’ फॉर्म (संशयित) मध्ये भरली जाईल. त्यांच्यासाठी
मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुका पातळीवरील सरकारी
रुग्णालये, आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची माहिती (पी फॉर्म)
संगणकाद्वारे भरली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुना
तपासणीनंतरच्या निदानाची माहिती (एल फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. हे तिनही फॉर्म एकमेकांशी जोडण्यात आले आहेत.
गावपातळीवर भरलेली माहिती सर्व सरकारी रुग्णालये, प्रयोगशाळांना
पाहता येऊ शकते.